गांधी हत्याकट आणि स्वा. सावरकर


स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा महात्मा गांधी यांच्या हत्येत अजिबात हात नव्हता, असे ख्यातनाम संशोधक-लेखक प्रा. शेषराव मोरे यांचे मत आहे. अंदमानात नुकत्याच झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून मोरे यांनी या विषयाला हात घातला होता. त्यांचे म्हणणे असे, की गांधी हत्येच्या आरोपातून न्यायालयाने सावरकरांची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर सावरकर हयात नसताना गांधीहत्येची चौकशी करण्यासाठी सरकारने कपूर समितीची नेमणूक केली होती. सावरकरवाद्यांनी सावरकरांच्या सांगण्यावरून गांधींची हत्या केल्याचा उल्लेख या समितीने जाता जाता नमूद केला. मात्र अहवालाच्या दोन खंडांमध्ये या संदर्भातील एकही पुरावा समितीने दिलेला नाही. समितीला असा उल्लेख करण्याचा अधिकार नव्हता. मात्र अहवालातील त्याच परिच्छेदाचा आधार घेऊन सावरकरांच्या विरोधात लिहिले जाते. न्यायालयाने सावरकरांनी निर्दोष मुक्त केले असल्याने गांधीहत्येत त्यांचा हात होता, असे कुणी म्हणत असेल तर त्याबाबत पोलिसांत तक्रार केली पाहिजे. कपूर आयोगाच्या अहवालातील तो परिच्छेदच रद्द करण्यासाठी सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी. आताचे सरकार किमान सावरकरद्वेषी नाही. त्यामुळे याचा विचार होईल असे वाटते. यासंदर्भात अनुयायांनी पुढाकार घ्यावा.

मोरे यांचा तीव्र आक्षेप आहे तो कपूर आयोगाच्या सावरकरांसंबंधीच्या निष्कर्षांवर. गांधीहत्या अभियोगातून न्यायालयाने सावरकरांची निर्दोष सुटका केली आहे. (He is found not guilty of the offences as specified in the charge and is acquited…) पण कपूर आयोग म्हणतो की सावरकरांचा कटात हात होता. मोरे म्हणतात तसे म्हणण्याचा आयोगाला अधिकारच नव्हता. शिवाय तसे म्हणण्यायोग्य कोणताही पुरावा न्यायालयाने दिलेला नाही. मग आयोगाने कशावर विसंबून सदरहू निष्कर्ष काढला. हे पाहण्यासाठी हा आयोग कोणत्या परिस्थितीत स्थापन झाला ते समजून घेतले पाहिजे.

गांधीहत्या कटाचा निकाल लागून सुमारे सोळा वर्षे झाली होती. मुळात असा काही कट नव्हताच हे नथुराम गोडसेचे म्हणणे होते. न्यायालयात मात्र पुराव्यानिशी असा कट असल्याचे सिद्ध झाले होते.

Read more...

कोण म्हणतो हे टिळकांना रूचले नसते?

ज्या लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला ते जर आता असते आणि अशा प्रकारचा गोंगाटाचा गणेशोत्सव साजरा होताना त्यांनी पाहिले असते तर त्यांनाही हे रूचले नसते. उलट त्यांनीच अशा प्रकारच्या दणदणाटाच्या गणेशोत्सवाला विरोध केला असता.-    मुंबई उच्च न्यायालय, ता. २८ ऑगस्ट २०१५

सण आणि उत्सव सार्वजनिकरीत्या कसे साजरे करायचे ही सध्याची मोठीच वादंगाची गोष्ट. उत्सवप्रिय मंडळांचे म्हणणे असे की ही बाब धार्मिक. परंपरेने चालत आलेली. आम्ही याबाबतीत कोणाचेही ऐकणार नाही. उत्सव दणक्यात साजरे होणारच. विरोधी मंडळींचे म्हणणे असे की या उत्सवांनी सर्वसामान्य शहरी नागरिकांना त्रास होतो. तो होता कामा नये. यात प्रश्न गणेशोत्सवाचा आला की लोकमान्य टिळकांची आठवण सर्वांनाच येते. लोकमान्यांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणपत्युत्सवास चालना दिली. ते श्रेय त्यांचेच. हा उत्सव सुरू करण्यामागे त्यांची भावना निव्वळ धार्मिक होती असे मात्र नाही. ते स्वतःही काही फार मोठेसे आचारमार्गी नव्हते. तेव्हा हा उत्सव सुरू झाला तो लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना वाढवावी या हेतूने. साहित्य सम्राट न. चिं. केळकर यांनी या उत्सवाला राष्ट्रीय घटना म्हणून गौरविले आहे. तेव्हा एक बाब स्पष्ट व्हावी की हा उत्सव सुरूवातीपासूनच राजकीय स्वरूपाचा आहे. तत्पूर्वी तो होतच होता. राजेरजवाडे वगैरे लोक तो मोठ्या धामधुमीने तो करीत. दहा दहा दिवस तो चाले. त्यासाठी वाडे शृंगारले जात. हत्ती, घोडे लावून मिरवणुका निघत. मंडपांत गाणे-बजावणे, पुराण-कीर्तने, लळीते सोंगे वगैरे प्रकार होत. पण त्यामागील भावना धार्मिक असे. टिळकांनी त्या धार्मिक भावनेला राजकारणाची जोड दिली.

Read more...

राधेमाँचे कुठे काय चुकले?


बहुत ज्ञाती नागवलीं। कामनेने वेडी केली।
कामना इच्छितांच मेलीं। बापुडी मूर्खे।।
अनेक ज्ञानी म्हणविणारे लोक कामनेने वेडे झाल्याने नागविले जातात. त्यांना आत्मज्ञान प्राप्त होत नाही. आपली कामना पूर्ण व्हावी म्हणून धडपडणारी बिचारी ही मूर्ख माणसे काही न कमावताच मरून जातात.
(दासबोध, ५.२.३७)
००००००००००


काळ बाजारीकरणाचा आहे. या बाजाराचा एक मूलभूत नियम आहे. मागणी आणि पुरवठ्याचा. मागणीनुसार पुरवठा केला जातो. पुरवठा असेल आणि मागणी नसेल, तर ती उत्पन्न केली जाते. त्यासाठी पंधरावी कला - जी जाहिरात – ती पणाला लावली जाते. एकंदर बाजार सुरूच राहील हे पाहिले जाते. हा बाजार कशाचाही असू शकतो. तो धर्माचा असतो. अध्यात्माचा असतो. राधेमाँ हे अशा बाजारातील पुरवठ्याचे प्रकरण असते. राधेमाँ हे बाजारातील एक ब्रँडनेम असते. असे ब्रँड अनेक असतात. गरज आणि ऐपतीनुसार लोक त्या-त्या ब्रँडचा अंगिकार करीत असतात. हे एकदा नीट ध्यानी घेतले की राधेमाँच्या निमित्ताने सध्या जो काही गदारोळ सुरू आहे त्याचा अर्थ लावणे सोपे जाते.

Read more...

हवा भयगंडाची...

ग्लोबल वॉर्मिगच्या चर्चेने आपला जीव घाबरून जातो. पण भरपूर वनसंपदा होती, प्रदूषण नव्हते, रसायनांचा मारा नव्हता अशा प्राचीन काळात महाभयानक दुष्काळ पडायचे असे उल्लेख सापडतात, त्याचे काय?

Read more...

मिथक निर्मितीचा कारखाना


नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नातेवाईकांवर पं. जवाहरलाल नेहरू यांचे हेर वीस वर्षे पाळत ठेवून होते असा गौप्यस्फोट कोलकात्यातील पालिका निवडणुकांच्या तोंडावर होणे याला योगायोग म्हणायचे की कसे, हे ज्याने–त्याने आपण कोठे उभे आहोत यावरून ठरवावे. एक गोष्ट मात्र खरी राजकारणात योगायोगासारख्या गोष्टींना थारा नसतो. तेथील कायदे वेगळेच असतात. ऐन निवडणुकीच्या तोंडावर नेताजींविषयीची निवडक गोपनीय कागदपत्रे माध्यमांत पोचविली जातात, ती नेमकी नेताजींच्या नातेवाईकांवर काँग्रेस सरकार कसे पाळत ठेवत होते याबद्दलची असतात, त्यावरून नेताजी परतले तर आपले काय होणार ही भीती गांधी-नेहरूंच्या मनात कशी होती हे दिसते अशा बातम्या छापल्या जातात आणि नेहरू हा काँग्रेसचा नेता कसा सैतानी मनोवृत्तीचा हलका माणूस होता असा जोरदार प्रचार समाजमाध्यमांतून केला जातो, हे सगळेच कसे योजनाबद्ध आहे. काँग्रेसमुक्त भारत या महान योजनेचा एक छोटासा भाग म्हणूनही याकडे पाहता येईल.
ही योजना तशी जुनीच. मिथक निर्मिती हा तिचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.

Read more...